राज्यातील एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले रेशनचे धान्य
मंत्र भुजबळ यांची कबुली, कारवाई करण्यास विभागांना सांगणार
मुंबई : राज्यातील एक लाख २६२ सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी निकषात बसत नसताना रेशनकार्ड मिळवून त्यावर धान्य उचलले, अशी कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी विधानसभेत दिली. या संदर्भात हे कर्मचारी जिथे कार्यरत असतील त्या विभागांना त्यांच्यावर कडक कारवाई
करण्यासंदर्भात कळविले जाईल असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या गैरव्यवहारांसंदर्भात भाजपचे संजय सावकारे यांनी मूळ प्रश्न विचारला होता. सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य धान्य उचल केली की त्यांच्या नावावर कोणी धान्य उचलले, याची चौकशी करणार का आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचे कवच देणार का, असा प्रश्न सावकारे यांनी केला.